HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही आमची लायकी सिद्ध करु, पक्षाला दखल घेण्यास भाग पाडू !

मुंबई । ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा काल (३०डिसेंबर) पार पडला. मात्र, यात मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आज आमची लायकी नाही, असे कदाचित पक्षाला वाटत असेल. मात्र, आम्ही आमची लायकी सिद्ध करु आणि पक्षाला दखल घेण्यास भाग पाडू. त्यानंतरच मंत्रिपद मिळवू’ अशा शब्दांत त्यांनी पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट संकेत दिले. सरनाईक हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत.

सरनाईकांप्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनीही मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असून आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मात्र, सरनाईक यांनी नाराज नसल्याचे खंडन केले. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या विस्तारात ठाण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा समावेश झाला. त्याचबरोबर, शिवसेनेतून प्रताप सरनाईक यांचा समावेश होईल, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात ठाण्यातून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे विस्तारामध्ये सरनाईकांना संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु मंत्रिपदे जाहीर झाल्यानंतरही लॉटरी न लागल्याने सरनाईकांचा संताप झाल्याचे दिसत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा! – उद्धव ठाकरे

Aprna

“तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही ना?”, चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

News Desk