HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणारच,” अनिल देसाई यांची माहिती

मुंबई | महाराष्ट्रात राज्यसभेची सहा जागांसाठी बिनविरोधात होण्यासाठी महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपला ऑफर दिली की, “भाजपने राज्यसभेची एक जागा मागे घेतली. तर महाविकासआघाडी विधान परिषदेत एक जागा अधिक देण्याचे त्यांनी म्हटले.” परंतु, महाविकासआघाडीची ऑफर भाजपने धुडकावली. यानंतर आम्ही विधान परिषदेला पाचवी जागा लढवणार नाही. तुम्ही राज्यसभेचा तिसरा उमेदवार मागे घ्या, अशी ऑफर भाजपने दिली होती. यानंतर महाविकासआघाडी चर्चा करून सांगू, असे म्हटले. त्यानंतर शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांना वर्षावर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. “महाविकासआघाडी राज्यसभेचे उमेदवार मागे घेणार नाही,” असे देसाईने पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामुळे आता महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. 

अनिल देसाई म्हणाले, “महाविकासआघाडीने भाजपला ऑफर दिली. महाराष्ट्राची परंपरा आणि एक वेगळा पायंडा रचण्यासाठी होऊ खातलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा दोन उमेदवार, एक राष्ट्रवादी आणि एक काँग्रेस, असे महाविकासआघाडीने राज्यसभेसाठी ४ उमेदवार दिले आहे. आणि भाजपने राज्यसभेसाठी तीन उमेदवार दिले आहे. यामुळे भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावी. त्याबदल्यात विधान परिषदेत निवडणूक जी २० जून होणार आहे. महाविकासआघाडी भाजपला एक जागा द्यावी, असा प्रस्ताव महाविकासआघाडीच्या वतीने भाजपला दिला होता. भाजपने या प्रस्तावर चर्चा केली. आमच्या प्रस्तावाप्रमाणे त्यांचा देखील प्रस्ताव होता की, तुम्ही राज्यसभेचा एक उमेदवार मागे घ्या आणि आम्ही तुम्हाला विधानपरिषदेची जागा देतो. परंतु, हा प्रस्ताव घेण्याचा एक पाया असतो, आपआपल्या पक्षाचे मताचे गणित असेत. हे सर्व गणित महाविकासआघाडीकडे असताना, भाजप म्हणाले, आम्ही दिल्लीतील पक्षश्रेष्ठी बोलवून आम्ही कळवू, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही भाजपशी बोलणे केल्यावर ते सांगितले की, दिल्लीचे पक्षश्रेष्ठींनी आम्ही दिलेल्या प्रस्तावावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा विषय इथेच संपला. यानंतर तीन वाजून गेले. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सहा जागांसाठी सात अर्ज दाखल आहेत. राज्यसभेसाठी महाविकासआघाडीकडून २ शिवसेना, १ काँग्रेस आणि १ राष्ट्रवादी आहे. तर भाजपने तीन उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे राज्यसभेसाठी निवडणूक होईल. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणुका होणारच

यामुळे सहाव्या जागेसाठी आता घोडेबाजार होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अनिल देसाई म्हणाले, “घोडेबाजारसारख्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात होऊ नये. महाराष्ट्राची परंपर आणि महाराष्ट्राच इतिहास आहे. यापूर्वी राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या. त्यावेळेला सामंजस्यने सत्तारुढ आणि विरोधीपक्ष यांच्या तशी बोलणू होऊन, वेळोवेळी तोडगा काढण्यात आला. त्याप्रमाणे निवडणुका न घेता. बहुतांश जेवढे उमेदवार तेवढ्या जागा, अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या. पण, यावेळा महाविकासआघाडीने नेतृत्वाने सामंजस्यने एक प्रस्ताव ठेवला होता. दुर्दैवाने महाविकासआघाडीचा प्रस्ताव विरोधी पक्षाने मान्य केला नाही. यामुळे आता निवडणुका होणार आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही !

News Desk

इतक्या लाटा आल्या तरीही शिवसैनिकांनी आपला बालेकिल्ला राखला !

News Desk

शरद पवारांबद्दल पण बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?

News Desk