मुंबई | “मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, आमदारांना कोडले म्हणणारे मुर्ख, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि राणे टीका केली आहे. महाविकासआघाडीचे चारही उमेदवार निवडून येणार,” असा विश्वास देखील राऊतांनी आज (7 जून) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. राष्ट्रीय पक्षाचे आमदार आमच्यासोबत आहेत. अयोध्या दौऱ्याची तयारी उत्तम सुरू आहे. मतदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. तांत्रिक बाबी समजवण्यासाठी आणि मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे राऊतांनी स्पष्ट केले आहे.
आमदार लांब राहतात आणि मतदानासंदर्भात आमदारांना काही सूचना द्याच्या असतात. विधान परिषद आणि मतदानाची प्रक्रिया ही खूप तांत्रिक असते. वेगळ्या प्रकारचे मतदान असते, यासदंर्भात आमदारांना थोडे मार्गदर्शन करायचे असते. म्हणून आमदारांना एकत्र ठेवले जाते. अशा प्रकारे भाजपने देखील त्यांच्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील ठेवते. त्याबद्दल थोबाडावर प्रश्न चिन्ह निर्माण करावे, असे काय आहे. कशा करता, तुम्ही केलेले चालते. तुमचे गेट टू गेदर आणि आम्ही आमदारांना बाजुला घेऊन गेलो. मुर्ख लोक आहेत ती, शिवसेनेचे त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही, असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाल, “असे कोण म्हणतय, रवी राणा असे म्हणाले, असे पत्रकार म्हणाल्यावर राऊत म्हटले काय सकाळ सकाळी कोणाचे नाव घेताय तुम्ही. हे प्रश्नचे आहेत ना मिडियासमोर चर्चा करण्यासारखे नाहीत. मी तुम्हाला ऐवढेच सांगू शकतो की, शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महाविकासआघाडीच्या चारही जागा निवडून येतील. आता कोण काय बोलतय, कोण काय टोमणे मारतोय आणि कोण काय पिना मारतय. त्या जावू नका. 10 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता. निकाल स्पष्ट झालेले असतील. क्रॉस वॉटिंगचा शब्दच काढायचा नाही. राजकीय पक्षाचे आमदार आहेत. त्यांना मत हे दाखवून त्यावे लागते. खुले मतदान आहे. कदाचित अपक्ष यांना लागू होत नसेल. शिवसेना किंवा महाविकासआघाडी यांच्यासोबत जे अपक्ष जे आमदार आहेत. त्यातले सगळे आमदार काल उपस्थित होते.”
क्रॉस वोटिंग शब्दच काढायचा नाही
शिवसेनेचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही का? असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाल, “असे कोण म्हणतय, रवी राणा असे पत्रकारांनी म्हटल्यावर राऊत म्हणाले, “काय सकाळ सकाळी कोणाचे नाव घेताय तुम्ही. हे प्रश्नचे आहेत ना मीडियासमोर चर्चा करण्यासारखे नाहीत. मी तुम्हाला ऐवढेच सांगू शकतो की, शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. आता कोण काय बोलतय, कोण काय टोमणे मारतय आणि कोण काय पिना मारतय. त्या जावू नका. 10 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता. निकाल स्पष्ट झालेले असतील. क्रॉस वोटिंग शब्दच काढायचा नाही. राजकीय पक्षाचे आमदार आहेत. त्यांना मत हे दाखवून द्यावे लागते. खुले मतदान आहे. कदाचित अपक्ष यांना लागू होत नसेल. शिवसेना किंवा महाविकासआघाडी यांच्यासोबत जे अपक्ष जे आमदार आहेत. त्यातले सगळे आमदार काल उपस्थित होते.”
भाजपमुळे आपल्याला लहान देशाकडून मोठ्या देशाला माफीचा दबाव