HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन साधला संवाद

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पहिल्यांदा औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पायउतार झाल्यानंतरचा हा त्यांच्या पहिला दौरा आहे. उद्धव ठाकरे यांचे औरंगबादमध्ये येथील विमानतळावर शिवसैनिकांकडून स्वागत केले आहे. उद्धव ठाकरेंच्या आजपासून (23 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्यादौऱ्याची सुरुवात ही औरंगाबादेतील दहेगावामधून होणार आहे.

 

या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसाना यांची पाहाणी करणार असून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहाणी करणार आहेत. आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात ठाकरे गटातील पक्षाचे खासदार विनायक राऊत, माजी खसदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे अंबाबादास दानवे, राज्यसभेतले प्रतिनिधी आणि प्रवक्ते अरविंद सावंत तसेच पक्षाचे सचिव अरविंद सावंत सोबत असणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे दोन ठिकाणांना भेट देणार आहेत.

 

 उद्धव ठाकरेंचा औरंगाबादचा असा असणार आहे

1) औरंगाबाद विमानतळाहून दहेगाव ता. गंगापुरकडे निघणार

2)  दहेगाव ता. गंगापुर येथे आगमन व दहेगाव शिवार येथे पीक नुकसानीची पाहणी

3) पेंढापूर ता. गंगापुरकडे निघणार

4) पेंढापूर ता. गंगापुर येथे आगमन व पीक नुकसानीची पाहणी

5)  पत्रकारांशी संवाद

6)  चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद निघणार

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर

News Desk

“मी तसं म्हणालो नाहीच!” निधीच्या विधानावरुन अशोक चव्हाणांचा युटर्न

News Desk

उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना होणार

News Desk