HW News Marathi
महाराष्ट्र

अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा, शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार ?

मुंबई। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. यानंतर शिवसेनेत राजकीय हालचालींना वेग आला. शिवसेनेला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेने भाजपशी सर्व संबंध तोडावेत, एनडीएमधून आणि पर्यायाने सत्तेतून बाहेर पडावे, अशी अट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी घातली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी ट्वीट करत केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे, असे ट्वीट करत भाजपवर आरोप केला आहेत. सावंत यांनी ट्विट करत राजीनामा देणार दिल्यानंतर त्यांनी आज (११ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे.

सावंतांनी पुढे असे देखील ट्वीट केले की, “लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे, त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले. सावंत यांच्या पत्रकार परिषदे शिवसेनेची नमकी भूमिका स्पष्ट होणार असल्याचे बोले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसकडून  पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर  

News Desk

अहमदनगर हत्याकांडाची केस फासट्रॅक कोर्टात चालवा

News Desk

“दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करणं हे भाजपचे षडयंत्र!”

News Desk