HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीने पुन्हा सत्ता मिळवायची कशी?; अर्जुन खोतकरांनी सांगितला फॉर्म्युला

मुंबई । शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी आता ३ वर्षे आधीपासूनच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकासआघाडीला राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करायची असेल तर नेमका कोणता फॉर्म्युला योग्य ठरेल? याचं उत्तर आता अर्जुन खोतकरांनी दिलं आहे. “आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी प्रत्येकी ५०-५० जागा जिंकल्या तर सत्ता आपलीच आहे. भाजपला कधीच तेवढ्या जागा जिंकता येणार नाहीत”, असा थेट दावाच अर्जुन खोतकरांनी केला आहे.

अर्जुन खोतकर म्हणाले की, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकार चालवण्यात खंबीर आहेत. मी तुम्हाला विधानसभेचं सोपं गणित सांगतो. पुढच्या निवडणुकीत शिवसेनेने ५० आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेसनेही प्रत्येकी ५० जागा निवडून आणायच्या. म्हणजे एकूण दीडशे जागा. भाजपवाले पावणे दोनशे जागा जिंकू शकतात का? हे गणित लक्षात घ्या. असं झालं तर आम्ही पुन्हा येऊ म्हणणाऱ्यांचा कधीच नंबर लागणार नाही.भाजपने सत्ता विसरून जावी.”

आमचा एकच नवाब मलिक सर्वांना भारी पडला!

दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अर्जुन खोतकरांनी हा फॉर्म्युला सांगत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “राज्य सरकारला काही काम करूच द्यायचं नाही हे विरोधकांनी ठरवलं आहे. रोजच कोणी ना कोणी येऊन बोलत असतात. तोतरे, धातरे, फातरे सर्वच येऊन बोलत असतात. पण, आमचा एकच नवाब मलिक त्या सर्वांना भारी पडला. त्यानंतर सर्वच जण बिळात जाऊन बसले. मलिकांनी सर्वांची नवाबी संपवून टाकली”, अशी बोचरी टीकाही अर्जुन खोतकरांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्य सरकारने वेळकाढू धोरण न अवलंबता…” फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

News Desk

माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

News Desk

‘मेरे पुतले जला लो तुम ये शोला कम नहीं होगा’; भाजपच्या आंदोलनावर मलिकांचे शायरीतून प्रत्युत्तर

News Desk