HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

HwExclusive | Sanjay Raut | राज ठाकरे राज्यपालांचं महत्व वाढवतायत का ? संजय राऊत म्हणतात…

पुणे | संजय राऊत यांच्याशी एच.डबल्यू मराठीच्या सहाय्यक संपादक आरती मोरे यांनी बातचीत केली आहे. यावेळी शरद पवारांचे भाजपकडून आणि राज्यपालांकडून कौतुक होत आहे, असा प्रश्न विचारला असता त्यावर राऊत म्हणाले की, शरद पवारांचे नेतृत्व हे कौतुक करण्यासारखेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री अस्तानाशी शरद पवारांचे कौतुक करत होते. आणि आता पंतप्रधान झाल्यावरही बारामतीत येऊन त्यांचे कौतुक केले आहे. काही व्यक्तीमत्व ही राजकारणाच्या पलिकडे पाहायची असतात. जसे बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी होते. या काळात शरद पवार असे एकमेव ज्येष्ठ नेते आहेत. ज्यांचं मार्गदर्शन देशाला होत असतं. राज्यपालांनी त्यांचे कौतुक केलं ही आनंदाची गोष्ट आहे. आणि राज्यपालांनी देखील अधूनमधून पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांचें मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे राजभवनामध्ये त्यांना अधिक काम करता येईल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीज दरवाढीबाबत राज्यपालांची भेट घेतली या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, वीज दरवाढी संदर्भात उर्जामंत्री नितिन राऊत हे काम करत आहेत. सरकारची आर्थिक परिस्थिती आणि एकंदरीत स्थिती पाहता काही निर्णय घेण्यास उशिर होतो. काही तांत्रिक बाबी आहेत त्यातुंन मार्ग निघेल असे नितिन राऊतांचे वक्तव्य मी ऐकले आहे. यात नक्की राज्यपाल काय करु शकतात मला माहित नाही. राज्यपालांना असे कार्यकारी अधिकार नाही आहेत. ते या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. फार तर सरकारला एखाद्या पेच प्रसंगाच्यावेळी ते मार्गदर्शन करु शकतात, असे संजय राऊत एच.डबल्यू मराठीशी बोलताना म्हणाले आहेत.

मग राज ठाकरे राज्यपालांचे महत्व का वाढवत आहेत? या प्रश्नावर तो म्हणाले की, ते काही महत्व वाढवत नाही. या राज्याला मुख्यमंत्री आहेत. हे सरकार तीन पक्षाचे आहेत. तीन पक्षाचे प्रमुख नेते आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालत आहे आणि त्यांच्या हुकुमाखीलच हे सरकार चालणार, असे रोखठोक उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.

मुख्यमंत्र्यांना मुंबईपलिकडे काही माहित नाही या टिकेवर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, हीच टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही होते. मोदी गुजरातच्या पलिकडे काही पाहत नाही, अशी टीका होते. तसं काही नाही आहे. पंतप्रधानांना अलिकडच्या काळात देशांचं चांगल ज्ञान प्राप्त झालं. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे देशांचं नेतृत्व अनेक वर्ष करत आहेत. मुख्यमंत्री झाले म्हणजे नेतृत्व करतात असं नाही. एखाद्या पदावर आहेत म्हणून नेतृत्व करतो असं नाहीत. तर शिवसेनाप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी अनेक वर्ष राजकारण केले आहे. राज्य कसं चालवायचं हे त्यांना माहित आहे. विरोधी पक्ष जो कालचा सत्ताधारी पक्ष होता त्यांची सत्ता गेल्यामुळे त्यांच्या व्यथा आणि वेदना आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करुन राज्याच्या जनतेची मने विचलित होणार नाहीत. आणि सरकार पुढची ४ वर्ष चालणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांच्यावर FIR होऊन अटक शकते का ? अॅड.असिम सरोदे काय म्हणाले ?

News Desk

Nitesh Rane And Balasaheb Tahckeray | ‘बाळासाहेब’ असते तर मला शाबासकी दिली असती ..!

Arati More

भाई जगतापांसोबत झालेल्या वादावर झिशान सिद्दीकींनी काय गौप्यस्फोट केला?

News Desk