HW News Marathi
महाराष्ट्र

‘गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा’! संजय राऊत म्हणाले…..

मुंबई। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल(११ सप्टेंबर) अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. अनेक राजकारण्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया आता दिल्या आहेत.

तो भाजपचा अंतर्गत प्रश्न

भाजपने गुजरातचा मुख्यमंत्री बदलला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्याचा मुख्यमंत्री बदलणं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले. यापूर्वी काँग्रेसनेही मुख्यमंत्री बदलले. हा त्या पक्षाचा अंतर्गत संरचनेचा भाग आहे. त्यावर इतरांनी बोलू नये. पण एक सांगतो गुजरातमध्ये भाजपची स्थिती बरी नाही. पाच वर्षापूर्वी भाजपला काठावरचं बहुमत मिळालं. ते बहुमत आणण्यात आलं. बिहारमध्ये शेवटच्या क्षणी काही जागा जशा खेचून आणल्या तेच गुजरातमध्ये झालं, असा चिमटा काढतानाच पक्ष मजबूत करणं हा त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित होणार नाही, असंही ते म्हणाले.

काय म्हणाले राऊत?

सरकारच्या अस्थिरतेबद्दल विरोधकांकडून केल्या जात असलेल्या विधानांवर राऊत म्हणाले, ‘असा हवेत गोळीबार करून चालत नाही आणि कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत. चंद्रकांत पाटील असतील किंवा भाजपचे आणखी कोणी लोक असतील; ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात, तर त्यांनी तो आनंद घ्यावा पण वारंवार हेच सांगतो की हे सरकार पुढील तीन वर्ष देखील उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल’, असा दावा राऊत यांनी केला आहे .

‘उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत. या संघटनांनी सांगितलं आहे की. तुम्ही (शिवसेना) निवडणूक लढा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत, त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळणं गरजेचं आहे’, असंही राऊत यांनी सांगितलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बोलणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं ! गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना डिवचले

News Desk

आर्यन खानच्या बेलसाठी राम कदम यांचं देवाकडे साकडं!

News Desk

मविआ सरकार ‘हे’ इतिहासातील सर्वात भ्रष्टचारी सरकार! – देवेंद्र फडणवीस

Aprna