HW News Marathi
महाराष्ट्र

‘ही तर बाळासाहेबांची शिकवण!’

ठाणे। केंद्रीय मंत्रायची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेवरून आत राजकारणात नवीन चर्चांना उधाण आला आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री जात आहेत, तेथील जनतेशी संवाद साधत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा बुधवारी बदलापूरमध्ये आली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपच्या मंचावर जाऊन त्यांचं स्वागत केलं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेकडून सत्कार

एकीकडे जिथे दोन विरोधी पक्ष राजकारणात एकमेकांसमोर येतात आणि एक दुसऱ्यांचे वाभाडे काढतात तिथेच दुसरी कडे एकमेकांचं कौतुक करतानाही दिसत आहेत. कपिल पाटील हे भिवंडी लोकसभेचे खासदार असून बदलापूर शहर हे भिवंडी लोकसभेत येतं. या मतदारसंघाचे खासदार केंद्रात राज्यमंत्री झाल्यामुळे कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं बदलापूर शहरात जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यातच बदलापूरच्या घोरपडे चौकात भाजपनं कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या मंचावर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांचं स्वागत करत त्यांचा सत्कार केला आहे.

शिवसेनेची आणि बाळासाहेबांची शिकवण

शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना विचारलं असता, आपल्या स्थानिक खासदारांची केंद्रात मंत्री म्हणून निवड होणं, ही शहरासाठी आनंदाची बाब असून एखाद्या वरिष्ठांचं स्वागत करणं, शहरात आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं ही शिवसेनेची आणि बाळासाहेबांची शिकवण असल्याचं वामन म्हात्रे म्हणाले आहेत.

तसंच कपिल पाटील हे युतीचे खासदार म्हणून निवडून गेले असून त्यांच्या विजयात शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून झालेली निवड ही बदलापूर शहरातल्या शिवसैनिकांसाठी सुद्धा आनंदाची बाब असल्याचं वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केलं. तसंच आपण त्यांना बदलापूर शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी केली असून कपिल पाटील यांनीही विकासकामांना गती देण्याचं आश्वासन दिलं असल्याचं वामन म्हात्रे यांनी सांगितलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेश चतुर्थीच्या बैठकीला राणे परिवाराला का बोलवलं नाही ?

News Desk

अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त

News Desk

आंध्रा प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा जाहीर निषेध  

News Desk