HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आणि विधानांवरच शिवसेना चालतेय, शिवसेनेचे फडणवीसांना प्रत्युत्तर 

मुंबई | हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील नियोजित स्मारकाचं पुढे काय झालं? ते कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं का वापरलं जातं? असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला होता. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक होत प्रत्युत्तर दिलं आहे. यावर “आजच्या दिवशी टीका-टिप्पणी करणं योग्य नाही. यावर यथावकाश योग्य ती उत्तरं दिली जातील,” अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यावरही अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आणि विधानांवरच शिवसेना चालत आलेली आहे,” अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर दिली. “हिंदुत्ववादी विचारांशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन,” असे फडणवीस म्हणाले होते.

“बाळासाहेब आमच्यातून गेले असले तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्यावर कायम आहेत. बाळासाहेबांनी आशीर्वाद दिल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे. बाळासाहेब हे सर्व शिवसैनिकांचे दैवत आहेत. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर आम्ही पुढे चालत आहोत,” असेही अनिल परब म्हणाले आहेत.

विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम,” असा केला आहे. या कॅप्शनच्या माध्यमातून फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. बिहार निवडणुकींमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रामधील शिवसेना- भाजपची युती तुटल्यासंदर्भातील चर्चा पुन्हा होऊ लागल्या. मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वाटपावरुन भाजप शिवसेनेत पडलेली फूट ही दिलेला शब्द न पाळल्याचे झाल्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता फडणवीस यांनी पुन्हा एकदा, “विधानांवर ठाम” असा बाळासाहेबांचा उल्लेख करुन शिवसेनेला डिवचलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या स्वातंत्र्याला फोन टॅपिंगमुळे धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा!

News Desk

औरंगाबादच्या कचराकोंडीला राज्यसरकारही जबाबदार | उद्धव ठाकरे  

News Desk

वैतरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 10 कामगारांना NDRF च्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले

Aprna