HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीसाठी आता जिवंत शेतकऱ्यांचे श्राद्ध

यवतमाळ – वारंवार प्रयत्न करूनही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकार गंभीर नसल्याचे दिसले. त्यामुळे जिवंत शेतकऱ्यांची शवयात्रा काढून आंदोलन केल्यानंतर, आता जिवंत शेतकऱ्यांचे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात येणार आहे.

सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी यवतमाळ येथे जिवंत शेतकऱ्यांच्या तेरवीचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्टल ग्राऊंडजवळील तिरंगा चौकात ही तेरवी होईल, अशी माहिती शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी पत्रपरिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांना तेरवीच्या जेवणाला आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी या तेरवीच्या भोजनासाठी यावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीत अनेक सामाजिक संघटना आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीला स्थान देण्यात आले आहे. सुकाणू समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे १४ ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून यवतमाळ शहरातील बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साखर उत्पादनासोबत कारखान्यांनी इथेनॉल, वीज आणि हायड्रोजन उत्पादन करण्यावर भर द्यावा – शरद पवार

News Desk

वाकवली ती मान अन् म्हणे पक्ष ‘स्वाभिमान’ !

News Desk

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी या अभिनेत्रींना NCB ने बजावले समन्स

News Desk