HW News Marathi
महाराष्ट्र

साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा विचार करा; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं होतं. ‘मी एका जबाबदारीने मुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे. केवळ वडिलांना दिलेल्या वचनामुळे हे पद मला स्वीकारावं लागलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. त्यानुसार भाजपने शब्द पाळला असता व शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित आज मी राजकीय जीवनातून बाजूलाही झालो असतो,’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील हाच धागा पकडत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे.

सरकारी चुकीमुळं विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाचा मुद्दा उपस्थित करत चित्रा वाघ यांनी ट्वीट केलं आहे. ‘मुख्यमंत्री कालच्या भाषणात गोंधळलेले दिसले. तीच परंपरा प्रशासनाने सुरू ठेवलीये. हे सरकार सलग दुसऱ्यांदा आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झालंय. सरकारी चुकीमुळं विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यांना संधी पुन्हा द्यावी ही आमची मागणी आहे,’ असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

‘मुख्यमंत्री काल म्हणालेत की मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलंय. दोनदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झालाय. साहेब राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना,’ असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हसन मुश्रीफांवर अजून एक गंभीर आरोप!

News Desk

“बीडमध्ये माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय?” – पंकजा मुंडे

Aprna

सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची सून!

News Desk