HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर आता राज्यानेही एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय घ्यावा”- प्रवीण दरेकर

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे सुरू आहे. आणि आता याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले आहेत. शरद पवारांना जेलमध्ये गेलेल्या देशमुखांचे दुःख आहे. मात्र, ते काही आंदोलन करून आत गेले नाहीत. सामंजस्याची भूमिका घेणारे पवार आता फारच आक्रमक झाले आहेत. त्यांना विनंती आहे की, एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा बदला त्यांनी घ्यावा, असे आवाहन शुक्रवारी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा कृषी कायदा पंतप्रधानांनी आणला. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे कायदा प्रतिष्ठेचा न करता मागे घेतला. आता केंद्र सरकारने निर्णय घेतला. राज्य सरकारनेही एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय घ्यावा. अन्यथा करो या मरोची लढाई सुरू करू, असा संतप्त इशारा आता भाजप नेते प्रवीण दरेकर आणि शरद पवारांना दिला.

एसटी आंदोलन शमवायचे असेल, तर विलीनीकरण एवढाच पर्याय

पुढे प्रवीण दरेकर म्हणाले की, अनिल परबांचा अहंकार काही जात नाही. अनिल परब तुमचा कोणताही प्रयोग चालणार नाही. अस म्हणत कोरोनावर लस काढली तसे एसटी आंदोलन शमवायचे असेल, तर विलीनीकरण एवढाच पर्याय आहे. नाशिकच्या गहिनीनाथ गायकवाड या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आतापर्यंत 40 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.पोलिसांनी लक्षात घ्यावे. उद्या यांनी हत्यार हातात घेतले, तर त्यांना दोषी ठेवू नका, असा इशारा देखील आता प्रवीण दरेकर यांनी दिला.

एसटी कर्मचाऱ्यांचे लिडर लेस आंदोलन

विलीनीकरणाचा विषय जो माझ्या हातात नाही. तो निर्णय कोर्टानं नेमलेल्या कमिटीच्या हाता आहेत. ते सोडून कोणत्याही चर्चेला माझी तयारी आहे. परंतु चर्चा नेमकी कोणाशी करायची हे लिडर लेस आंदोलन झाले आहे. त्यामुळे कामगारांनी सांगावे, त्यांचं प्रतिनिधीत्व कोण करणार, कोण करणार हे सांगावे. त्यांना चर्चेला कधीही बोलवू शकतो. त्यांच्याशी चर्चा करू शकतो. एसटी संपामुळे जो डेड लॉक झाला. हा राज्यातील जनतेला. एसटीला हानीकारण आहे ऐवढेच कळते, असे स्पष्ट मत परबांनी मांडलं.

एसटी कामगारांनी वेतन वाढीवर चर्चा करावी

वेगवेगळ्या राज्यांचा अहवाल देखील आम्ही मागितला आहे. आमचे अधिकारी देखील वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतात. तेथे कशा पद्धतीनं एसटी चालतं. कामगारांचे पगार, वेतन श्रेणी, आता सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करत आहेत. भाजप नेते गोपीनाथ पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा बोलो. हे देखील जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरणार तर मग हा तिडा कायम राहिल, असे ते म्हणालं. संपामुळे एसटी आणि कार्मचारी नुकसान होय. असे परब म्हणालं. कामगारांनी वेतन वाढीवर चर्चा करून आपलं वेतन वाढवून घेतले पाहिजे, असे आवाहन परबांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढीव वीज बिलासंदर्भात बातचीत करण्यासाठी अदानी CEO कृष्णकुंजवर

News Desk

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक” प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य!

News Desk

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे मुंडे गटात नाराजी? भावनिक पोस्ट झाली व्हायरल

News Desk