HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकार मधील आणखीन काही नेते किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर!

जालना। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर महाविकास आघाडी सरकार सातत्याने असते. आणि आता देखील तसंच काहीसं झाल आहे. पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते घोटाळेबाज असून, येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या आणखी चार नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराच आता सोमय्या यांनी जालन्यात बोलतांना दिला आहे. सोमय्या पुढे बोलतांना म्हटले आहेत की, येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील चार नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होणार असून, त्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांचा समावेश आहे.

हरित लवादाने जबाब नोंदवण्यास सांगितले

यावेळी किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अनिल परब आणि अर्जून खोतकर यांच्यावर देखील टीकेची झोड उठवली आहे. अर्जून खोतकर यांचा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असल्याचा सोमय्या यांनी दावा केला आहे. खोतकर यांनी जालना सहकारी कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप यापूर्वीच सोमय्या यांनी केला होता. अर्जुन खोतकर यांनी कुटुंबीयांशी मिळून हा भ्रष्टाचार केला. पुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण दाबले गेल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. दरम्यान अनधिकृत रिसाॅर्ट प्रकरणी अनिल परब यांना हरित लवादाने जबाब नोंदवण्यास सांगितले असल्याचा गोप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.

अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीची छापेमारी

ईडीकडून शुक्रवारी सकाळी सुरु असलेली छापेमारी रात्री दोन वाजेपर्यंत सुरु होती. अर्जुन खोतकर यांच्या घरावर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पथकाकडून छापेमारे करण्यात आली. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वरून ईडीकडून शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून ही कारवाई सुरु आहे. आजही ईडीच्या पथकाकडून तपास करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मधील एका उद्योजक आणि व्यावसायिकाच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीचं कनेक्शन खोतकरांशी असल्याचं समजतेय. जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप. त्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही! – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Aprna

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा ५०-५० चा फॉर्म्युला

News Desk

अहमदनगर शहरातील राजकीय गुंडगिरी रोखणार कोण ?

News Desk