HW News Marathi
महाराष्ट्र

खोत, पडळकरांसह रात्रभर चर्चा; आज ST कर्मचारी संप मागे घेणार?

मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (२४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाची संप मागे प्रतिक्षा सरकार करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आज (२५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता निर्माण घेणार असल्याची माहिती खोतांनी दिली आहे. परंतु सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर, नाशिक आणि पुणे येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारशी चर्चा करून खोत आणि पडळकर आझाद मैदान पोहोचल्यानंतर रात्री कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संप मागे घेणार की नाही हे आज सकाळी कळले, असे खोतांनी माध्यमांना सांगितले.

“गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. या संपात कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची प्रमुख मागणी होती. याबाबत सरकार म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत होतो. एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयात असून त्रिसदस्यीय समिती बनवली आहे. या समितीला विलीनीकरणाचा निर्णय १२ आठवड्याच्या आत समितीने घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. समिती जो अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाईल. यानंतर समितीचा अहवाल उच्च न्यायालयात पाठविला जाणार आहे. “उच्च न्यायालयाने विलीनीकरणाबाबत समिती स्थापन केली आहे. या समितीची जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू अशी आमची भूमिका पूर्वीच जाहीर केली होती,” असे परबांनी स्पष्ट केले आहे.

कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावं!

कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे. कामावर रूजू होताच त्यांच्यावर सरकारकडून केलेली कारवाई मागे घेण्यात येईल. परंतु, जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्या कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परबांनी सांगितले. तसेच नव्याने झालेली वेतनवाढ नोव्हेंबरच्या पगारापासून देण्यात येईल, वेतनासाठी आवश्यक निधी राज्य शासन देणार असून पगार वेळेत देण्याची हमीही राज्य शासनाने घेतली आहे.असे परबांनी पत्रकार परिषदेतून दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा! – अजित पवार

Aprna

’31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील’- किरीट सोमय्या

News Desk

कर्जबाजारी शेत-यांने केली आत्महत्या

News Desk