HW News Marathi
महाराष्ट्र

“गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करतात”

मुंबई | राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज (१० जानेवारी) सह्याद्री अतिथी गृहावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील वेगवेगळ्या एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. तर या बैठकीनंतर समितीच्या सदस्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. यावेळी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही टीका केली आहे. ‘आमची चूक झाली’, असे म्हणत आता आपण वकील बदल असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली, अशी टीका एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. तर आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कृती समितीने दिली. त्यामुळे अखेर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचं शरद पवारांनी आश्वासन दिलं आहे. तर एसटी कृती समितीचे सदस्य अजय गुजर यांनी सदावर्तेंची वकीली मागे घेतली असल्याची माहिती दिली.

सदावर्तेच डिप्रेशनमध्ये असल्यासारखे वाटते

तर विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात भ्रम निर्माण केला, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच सदावर्तेंच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे, याची माहिती नाही. पण, ते सांगतात की, एसटी कर्मचारी नैराश्यात गेले आहेत. मात्र, आम्हाला तर सदावर्ते हे स्वतःच डिप्रेशनमध्ये आहे, असं वाटतंय. ते फक्त लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत, असे कास्ट ट्राईब परिवहन संघटनेचे सरचिटणीस सुनील निर्भवणे यांनी म्हंटले आहे.

एसटी टिकली तरच त्यांचा रोजगार टिकणार

सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने भडकावण्याचा प्रयत्न करतात. आम्ही शरद पवार आणि अनिल परब यांच्याशी चर्चा केली असून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमधील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच ज्यांची नोकरी गेली आहे, अशा कर्मचाऱ्यांची नोकरी देखील वाचणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपली रोजीरोटी वाचवली पाहिजे. एसटी टिकली तरच त्यांचा रोजगार टिकणार आहे, हा विचार कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे, असेही निर्भवणे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठी अनुदानात वाढ

Manasi Devkar

नया है वह! अब्दुल सत्तार यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा टोला

Aprna

देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे, खडसेंनी करुन दिली आठवण

News Desk