HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात अगदी योग्य वेळी आपली सत्ता आली !

बारामती | काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळ जुळून यावी लागते. आता ती वेळ जुळून आली आहे. महाराष्ट्रात अगदी योग्य वेळी आपली सत्ता आली, असे सूचक विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. शेतीच्या फायद्यासाठी जे काही करायचे ते सरकार करणार असल्याचे आश्वासन देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे काल (१६ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे कौतुक केले आहे.

“पवारसाहेब मला थोड्या वेळापूर्वी सुप्रिया ताईंनी विचारले की, तुमचे घड्याळाचे दुकान आहे का? मी म्हटले दुकान नाही. मात्र, घड्याळवाले माझे पार्टनर आहेत”, असे उद्धव ठाकरे बोलताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यानंतर उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “ती वेळ जुळून यावी लागते, नाहीतर काही उपयोग नसतो. अशी सगळी चांगली वेळ जुळून आली आहे. योग्य वेळेला महाराष्ट्राची सत्ता आपल्या हाती आली आहे.”

या कार्यक्रमादरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची एक आठवण सांगितली. “मी हेलिरकॉप्टरमधून आल्यानंतर फुलांचे ताटवे बघितले. ते बघितल्यानंतर पहिल्यांदाच मन हरपून गेले. मला लहानपण आठवले. आम्ही लहान असताना गच्चीवर स्वत: बाळासाहेबांनी वाफे घेतले होते. या वाफात विविध पिके असायची”, असा किस्सा उद्धव ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraResult2019 : परळीत धनंजय मुंडे विजयी, तर पंकजा मुंडे पराभूत

News Desk

मुंबईतील अतिवृष्टीसाठी फक्त शिवसेनेवर टीका, सामनातून उद्धव ठाकरेंचा सवाल

News Desk

MPSC परिक्षेबाबत मुख्यमंत्री लवकरचं तोडगा काढणार,नाना पटोलेंच आश्वासन!

News Desk