HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसवी निघाली !

मुंबई | राज्य सरकारला विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी धारेवर धरले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा दावा मुंडेंनी केला आहे. गत वर्षी दिवाळीमध्ये राज्य गाजावाजा करत सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना आणली मात्र ही योजना फसवी निघाली. परंतु अद्याप त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नसल्याचे पुरावे मुंडेंनी विधीमंडळात मांडत सरकारवर टीका केली आहे.

वाशीम जिल्ह्यातील अशोक मनवर नावाच्या शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत बोलवून कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले होते. त्याच शेतकऱ्यांला अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. मनवर हे शेतकरी माझ्याकडे आले, त्यांनी मला राज्य सरकारने दिलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र दाखवले. मनवर हे एकमेव शेतकरी नसून प्रमाणपत्र मिळूनही कर्जमाफी न झालेले हजारो शेतकरी महाराष्ट्रात असल्याचे मुंडे यांनी सांगितले. कर्जमाफीच्या यादीत नाव येऊन, बँकेचा मॅसेज मिळवून देखील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे यावेळी मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचे खंदे समर्थक गुलाबराव चव्हाण यांच्या हाती भाजपचा झेंडा!

News Desk

महाविकासआघाडीत पुन्हा बिघाडी? कॉंग्रसे नेते बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

News Desk

मराठा आरक्षण | संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू

News Desk