HW News Marathi
महाराष्ट्र

मलिकांच्या राजीनाम्याबद्दल छगन भुजबळाचे मोठे विधान

मुंबई |  “मलिकांवर लावलेले आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही. तर मग त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही,” असे म्हणत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर पूर्णविराम लावला आहे. मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. मलिकांच्या राजीनाम्याचा आसुरी आनंद घेऊ देणार नाही. मलिकांची अटक ही दुर्दैवी बाब आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाविकासआघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान असल्याचे प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर भुजबळ म्हणाले, ” होय, हे महाविकासआघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान असून मुद्दाम एकेकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न. दरम्यान, मविआचे सर्व नेते मुंबईत उद्या (२४ फेब्रुवारी) मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ मलिकांवरील कारवाईच्या विरोधात आंदोलन करणार आहे. 

मलिकांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक घेतल्यानंतर भुजबळांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील बैठक झाली. या दोन्ही बैठकीनंतर भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मलिकांची अटक ही दुर्दैवी बाब आहे. ईडीचे अधिकारी आज पहाटे त्यांच्या घरी जावून त्यांना चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयता घेऊन गेले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. १९९२च्या घटना असून १९९९ साली दाऊतच्या त्या जागेचा करार झाला. मग, यानंतर १२ वर्षांनी पीएमएलएचा जन्म देखील झाला नव्हता. त्यावेळची या घटना असून १९९३ बॉम्बस्फोटमध्ये अनेक लोकांचा जीव गमावला, आरोपींना जेलमध्ये गेले आणि त्यांना फाशी झाली. 

मलिकांची ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केले. मलिकांना मेडिकल चेकअपसाठी जे. जे. रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी मलिकांनी “झुकेंगे नही, और लढेंगें,” अशी प्रतिक्रिया ईडीच्या कार्यलयातून बाहेर येताना दिली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज (२३ फेब्रुवारी) पहाटे ४.३० वाजता मलिकांच्या पोहोचले. ईडीच्या कार्यलयात मलिकांची सकाळी ७ वाजता घेऊन केले तर ७.४५ वाजल्यापासून कार्यलयात त्यांची चौकशी सुरू आहे. मलिकांच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिकांना ईडीने अटक केल्यापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यलयाबाहेर घोषणाबाजी केली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही’, मुख्यमंत्र्यांचा सांगलीकरांशी संवाद!

News Desk

मुंबई पोलिस समीर वानखेडेंना समन्स धाडण्याची शक्यता

News Desk

मिरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याबाबत आठवड्यात आवश्यक उपाययोजना कराव्यात! – जयंत पाटील

Aprna