HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू राहणार नाही ! मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गळाभेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. दरम्यान, त्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराकडे बराच वेळ चर्चा झाली. मात्र, या भेटीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरीही मुनगंटीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली आहे. आता आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची असेल ती करू द्या. शिवसेना काय अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू राहणार नाही.” दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

युतीमध्ये सडलो म्हणत युती तोडली पण पुन्हा सोबत आलोच !

सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना असेही म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत. मागे “युतीमध्ये सडलो” म्हणत युती तोडली. मात्र, आम्ही पुन्हा सोबत आलो. आता पुढे बघू काय होते?” , असे सूचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे, सुविधा तयार ठेवाव्या; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

swarit

सरकार तुमच्यासाठी काम करतंय, तुम्ही सरकारला सहकार्य करा !

swarit