HW News Marathi
महाराष्ट्र

‘सत्य बाहेर यायला हवं’, पेगससवर सर्वोच्च न्यायालयाचे सवाल

नवी दिल्ली | पेगससचं प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. या प्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर असल्याचं म्हणत यातील सत्य समोर यायल हवं असं मत नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ९ याचिकांवर सुनावणी केली. सरन्यायाधीश ए. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली आहे.

पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण म्हणाले, “पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर आहेत यात कोणतीही शंका नाही. या प्रकरणातील सत्य समोर यायला हवं. या फोन टॅपिंगमध्ये कुणाची नावं आहेत याविषयी आपल्याला कोणतीही माहिती नाही. यावेळी सरन्यायाधीशांनी दोन प्रश्नही उपस्थित केले. व्यक्तिगतपणे जे पीडित याचिकाकर्ते आहेत त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल का केली नाही? पेगसस प्रकरण 2019 मध्ये समोर आलं होतं, मग याचिकाकर्ते आत्ताच याचिका का दाखल करत आहेत? असे दोन प्रश्न रमण यांनी विचारले आहे.

“सामाजिक कार्यकर्ते, नेते, वकील, संवैधानिक पदांवरील व्यक्तींवर पाळत”

सिब्बल सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना म्हणाले, “पेगससद्वारे झालेल्या हेरगिरीत न्यायालयातील न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पेगससचा वापर करुन सामाजिक कार्यकर्ते, नेते, वकील, संवैधानिक पदांवरील व्यक्ती अशा अनेकांवर पाळत ठेवली जात आहे.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत महाभारतातले त्यामुळे धृतराष्ट्राला दिसत नाही ते त्यांना दिसतं, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!

News Desk

राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे १०४ व्या वर्षी झाले निधन

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यासाठी रवाना!

News Desk