HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांतच्या भावाची संजय राऊतांना नोटीस, सुशांतच्या वडलांबद्दल केलेल्या वक्तव्याची ४८ तासांत माफी मागा अन्यथा…

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात अनेक राजकीय घडामोडी सुरू झाल्या, एक राजकीय वळण या प्रकरणाला आले. दरम्यान, या प्रकरणात शिवसेनेवर होणारे आरोप फेटाळताना सुशांतच्या कुटुंबीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सुशांतच्या चुलत भावाने नोटीस पाठवली आहे. ‘तुम्ही केलेल्या वक्तव्यांबद्दल ४८ तासांत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा,’ असा इशारा या नोटीसमधून राऊत यांना देण्यात आला आहे ‘टाइम्स नाउ’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

१४ जूनला सुशांतने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला जवळपास दोन महिने उलटल्यानंतरही त्यावरून चर्चा, वाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. राज्यातील विरोधी पक्षाने आणि बिहार पोलिसांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरल्याने व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव यात अप्रत्यक्षरित्या घेतले जात असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. शिवसेनेनेही तातडीनं पुढाकार घेत हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

शिवसेनेवरील आरोप फेटाळताना संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केल्यामुळं सुशांत नाराज होता, असे वादग्रस्त विधान केले होते. त्याचबरोबर, अंकिताने सुशांतशी मैत्री का तोडली होती याचा तपास व्हायला हवा. या दुर्दैवी घटनेकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, अशी मागणीही राऊत यांनी केली होती.

“संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप करत सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू यानं केला आहे. या प्रकरणी त्यानं राऊतांना नोटीसही पाठवली आहे. ‘वादग्रस्त वक्तव्यांबद्दल ४८ तासांत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा,” असा इशारा सुशांतच्या भावाने दिला आहे. आता संजय राऊत माफी मागणार का? किंवा काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं 

News Desk

फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि कोर्टातही टिकवलं मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही –  शिवेंद्रराजे भोसले  

News Desk

मंत्रिमंळातील नव्या तीन मंत्र्यांची पदे धोक्यात

News Desk