HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे १२ निलंबित आमदार पोहोचले सर्वोच्च न्यायालयाच्या दारी!

नवी दिल्ली | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना शिवसेनेच्या भास्कर जाधवांना शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबित केलं होतं. या १२ आमदारांनी आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निर्णयावर स्थगिती रोखण्यासाठी मागणी केली होती, मात्र राज्यपालांकडून कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने पुन्हा या आमदारांच्या पदरी निराशा अली.

सर्वोच्च न्यायालयाकडे धाव

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने आता हे १२ आमदार थेट सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आहेत. निलंबनावर स्थगिती आणावी आणि पुन्हा पदावर कार्यरत करण्याची त्यांची मागणी आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी आणि त्यांच्या अंगावर धावून गेल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं.

काय होत प्रकरण?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विरोधी पक्षांमध्ये वादावादी होऊन गोंधळ सुरु झाला होता. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. एवढंच नाहीतर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे भाजपचे डझनभर आमदार निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साईबाबांच्या जन्मस्थळावरून राजकारण करून नका !

swarit

शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला, दरेकरांचा संजय राऊतांवर आरोप

News Desk

नागरिकांना कन्नड उपविभागीय कार्यालयात चांगल्या सेवा मिळणार! – सुभाष देसाई

Aprna