HW News Marathi
महाराष्ट्र

३७६ एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन राज्य सरकारची कारवाई


मुंबई।एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या आणि प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबवावे आणि एसटी कर्मचार्‍यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन सरकारकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतूक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेत, राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचार्‍यांना निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यभरातील आगारांमधील ३७६ एसटी

राज्यभरातील १६ विभागांतील ४५ आगारांमधील ३७६ एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये नाशिक विभागातील कळवण आगारातील १७ कर्मचारी, वर्धा विभागातील वर्धा आणि हिंगणघाट आगारामधील ४० कर्मचारी, गडचिरोली विभागातील अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील १४ कर्मचारी, चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, विकाशा आगारातील १४ कर्मचारी, लातुर विभागातील औसा, उदगीर, निलंगा, अहमपूर, लातुर आगारातील ३१ कर्मचारी, नांदेड विभागामधील किनवट, भोकर, माहुर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलुर आगारातील ५८ कर्मचारी, भंडारा विभागामधील तुमसर, तिरोडी, गोंदिया आगारामधील ३० कर्मचारी, सोलापूर विभागातील अक्कलकोट आगारामधील २ कर्मचारी, यवतमाळ विभागातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारातील ५७ कर्मचारी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-१ आगारातील पाच कर्मचारी, परभणी विभागातील हिंगाली व गंगाखेड आगारातील १० कर्मचारी, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील १६ कर्मचारी, नागपूर विभागामधील गणेपेठ, घाटरोड, इमामवाडा, वर्धमान नगर आगारातील १८ कर्मचारी, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील दोन कर्मचारी, सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपूर,आटपाडी आगारातील ५८ कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

एसटी महामंडळ अवमान याचिका दाखल करत आहे

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाच्या विरोधात न्यायालयाने आदेश दिला होता आणि हा संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यानंतर देखील काही संघटनांनी, एसटीच्या संपाची नोटीस दिली होती आणि म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टाने हा संप बेकायदेशीर आहे, असे जाहीर केलेले आहे. हे जाहीर केल्यानंतर देखील, हा संप सुरू असल्याचे काल आम्ही हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, हायकोर्टाने सूचना केली की याबाबत तुम्ही अवमान याचिका दाखल करू शकतात. म्हणून एसटी महामंडळ अवमान याचिका दाखल करत आहे, असे मंगळवारी परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार यांच्या बहिणीच्या ‘मुक्ता पब्लिकेशनवर’ प्राप्तिकर विभागाचा छापा

News Desk

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘अरुणोदय झाला’ गाणे राज ठाकरेंनी केले ट्विट

swarit

ते पाच नगरसेवक पुन्हा शिवबंधनात आले, नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन घेतली भेट

News Desk