HW News Marathi
देश / विदेश

रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या त्या ५ पोलिसांचं निलंबन अखेर मागे

जालना। केंद्रीय राज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या त्या पाचही पोलिसांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले. ही कारवाई राजकीय दबावापोटी झाल्याचा आरोप करीत हे निलंबन मागे घेण्याची मागणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून केली होती.

११ जून रोजी जालना जिल्ह्यातील जाफराबाद इथल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यलयाची झडती घेण्यात आली होती. एका पत्रकाराला मारणाऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेले होते. परंतु कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय संबंधित पोलिसांनी झाडाझडती केली तसंच यादरम्यान कार्यालयातील संचिका गहाळ झाली, अशी तक्रार रावसाहेब दानवे यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे केली होती.

कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी ११ जूनला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदा झाडाझडती घेतली. अशाच प्रकारे पोलिस खात्यात जनमानसात प्रतिमा मलिन होण्यास कारणीभूत होऊन कर्तव्यात बेकायदा व बेशिस्तीचे वर्तन केले, असा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशीअंती २ पोलिस उपनिरीक्षक व ३ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. याबाबत दानवे यांनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या अशी लेखी तक्रार केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल; पंजाब महिला आयोगाने घेतली दखल

Aprna

नाशिक मेट्रोचं मॉडेल केंद्रानं स्वीकारलं हे आनंददायी – देवेंद्र फडणवीस

News Desk

आम्हीच बाबरी मशीद पाडली, हे भाजप हिंमतीने मान्य का करत नाही ?

News Desk