HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ता टिकवण्यासाठी डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही

मुंबई | विरोधाकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. या अविश्वासाच्या ठरावावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीका केली आहे. काँग्रेससह बहुतके विरोधी पक्षांनी अविश्वासाच्या ठरावाला पाठिंबा दिला आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर सेना नेहमी मोदींवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. परंतु भाजपला सेना पाठिंबा देणार असल्याचा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, शनिवारी शिवसेना भाजपला पाठिंबा देणार का ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

सामनाच्या संपादकीय नेमके काय म्हटले ते पाहा

जगात आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो ठीक आहे, पण त्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेने आमच्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारातून सोडवलेले नाही. नाणारमधील रिफायनरीचे गॅस चेंबर रोखा असे ओरडून सांगणाऱ्या जनतेच्या छाताडावर बंदुका रोखणारी ही अर्थव्यवस्था हुकूमशाहीच्या मार्गाने जाणार असेल तर त्यावर फुले उधळण्यापेक्षा आम्ही जनतेच्या न्यायासनासमोर उभे राहून पापक्षालन करू. ज्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत गरीबांना, बेरोजगारांना स्थान नाही. ती अर्थव्यवस्था काय कामाची! येथे बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे ‘कसाई’ राज्य करतात. ‘सगळा माणुसकीशून्य कारभार सुरू आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठीच डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही. बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही. जनता सर्वोच्च आहे!’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांची राज्यपालांसोतबची भेट तुर्तास रद्द

News Desk

पक्ष बांधणीसाठी राज ठाकरेंचा दौरा 

News Desk

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीचे फोन आल्यामुळे वाढवली सुरक्षा

News Desk