HW News Marathi
महाराष्ट्र

“काय रे, अलिबागवरून आलायस का?”, असे कोणालाही विचारू नका

मुंबई | “काय रे, अलिबागवरून आलायस का?”, या विधानावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हे विधान अपमानजनक असल्यामुळे अलिकबागकरांच्या भावना दुखावल्या जात असल्याने अलिबागमधील सातीर्जे गावचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी अॅड. रघुराज देशपांडे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ‘विनोद हे सर्व समुदायाच्या लोकांवर होतच असतात. ते फारसे मनावर घ्यायचे नसतात,’ असे नमूद करत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

समाजात संता-बंता, रजनीकांत, सीआयडी, मराठी, गुजराती भाषिक विनोद तर होतात. त्यामुळे एकदा विनोद मनावर न घेता, त्याला केवळ विनोदाप्रमाणेच घ्या. यासाऱ्याचा आनंद घ्या, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सिनेमा, नाटक, टीव्ही वरच्या मालिकेत देखील “काय रे, अलिबागवरून आलायस का?” हे विधाने एकाद्या ठिकाणची लोक मुर्ख असल्याचे मानले जाते. परंतु हे विनाकारण अलिबागसारख्या समृद्ध आणि महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. या वक्तव्यने त्यांची ठिकाणाची बदनामी करणारे आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन ‘त्या’ दिवशी भेटले, सीसीटीव्हीत भेट कैद

News Desk

सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही; कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये! – मुख्यमंत्री

Aprna

कृषी विधेयकाबाबत काढलेल्या अधिसुचनेला राज्यात स्थगिती!

News Desk