HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांची राज्यपालांसोतबची भेट तुर्तास रद्द

मुंबई | शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांच्या आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटीसाठी जाणार होते. मात्र, या तिन्ही पक्षातील नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांसोबतची भेट तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील ओल्या दुष्काळासंदर्भात शासनाकडून लवकरत लवकर मदततीसाठी तिन्ही पक्षातील नेते भेट घेऊन चर्चा करणार होते. यासाठी तिन्ही पक्षातील नेत्यांचे शिष्टमंडळाने राज्यपालांसोबतची आज (१६ नोव्हेंबर) सायंकाळी ४.३० वाजताची भेट तुर्तास रद्द करण्यात आली.

याबाबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भेट रद्द झाल्याचे कारण स्पष्ट केले आहे. शिंदेंनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, “शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि या तीनही पक्षांचे एक शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, तीनही पक्षांचे महत्वाचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा, नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी.

यासाठी तसेच निवडणूक आयोगकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करणेसाठी आपापल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे माननीय राज्यपाल महोदय यांची आजची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. मानानीय राज्यपालांच्या भेटीची पुढील वेळ लवकरच कळविण्यात येईल, असे एकनाथ शिंदेनी म्हटले आहे.मात्र, तिन्ही पक्षाचे नेते पहिल्यांदाच उघडपणे एकत्र राज्यपालांची भेट घेणार होते, त्यामुळे या भेटीकडे राज्याचं विशेष लक्ष होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जपानहुन आलेल्‍या ६१ परदेशी नागरिकांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

News Desk

विनायक राऊतांचा केंद्र सरकारवर टीकेचा बाण तर खासदार प्रीतम मुंडेंचं सडेतोड उत्तर!

News Desk

एमटीएचएल प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

News Desk