HW News Marathi
महाराष्ट्र

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार मुहूर्ताची वाट का बघत आहे ?

पुणे| यंदा राज्यात परतीचा पाऊस कमी पडल्याने बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. पावसाच्या अभावामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आले आहेत. ज्या भागात ३१ टक्के पेक्षा जास्त दुष्काळ असल्यास त्या भागात चंदकांत पाटील ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या या निर्णयावर अजित पवार म्हणाले कि,” दुष्काळ घोषित करण्यासाठी वेळ का लावत आहेत ? दुष्काळ घोषित करण्यासाठी सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. यातून या सरकारची मानसिकता दिसत आहे.”

सरकारकडून दुष्काळ घोषित करण्यास निष्काळजीपणा होत असल्याने दुष्काळ पीडित भागांना हव्या त्या सवलती वेळेवर मिळणार नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. राज्यसरकारने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉल ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जलयुक्त शिवार बांधून काय उपयोग ? अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची तुम्ही वाट पाहणार आहात ?असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. जलयुक्त शिवाराबाबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणारी शिवसेना भाजपावर टीका करते. सत्तेमध्ये असून भाजपावर टीका करणे योग्य नाही. भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष राज्यातील परिस्थितीला जबाबदार आहेत. अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाभोळकर हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

News Desk

“उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे जेलमध्ये जाणार”, प्रदीप शर्मांवरुन सोमय्यांची टीका

News Desk

आरक्षणाचा अधिकार राज्यांना दिल्यानंतर खासदार संभाजीराजेंची भूमिका!

News Desk