HW News Marathi
महाराष्ट्र

‘मॉब लिंचिंग’ सारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र !

नागपूर | ‘एखाद्या घटनेला ‘मॉब लिंचिंग’सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र’ असल्याचा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. भागवत पुढे म्हणाले की, “मॉब लिन्चिंगच्या घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही. आमचे स्वयंसेवक अशी कामे करत नाहीत. जर एखादा स्वयंसेवक अशा घटनेत आढळला, तर संघ त्याला प्रोटेक्ट करत नाही. अशा घटनांमध्ये संघाचे नाव घेऊन संघाला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे.”

भागवत पुढे म्हणाता, “मॉब लिंचिंगमुळे कायदाव्यवस्थेच्या मर्यादेचे उल्लंघन करुन होणाऱ्या या घटना परस्पर संबंधांना नष्ट करत आहेत. अशी प्रवृत्ती ही आपल्या देशाची परंपरा नाही, आणि आपल्या देशाच्या संविधानात देखील ती बसत नाही. कितीही मतभेद असले तरी कायदा व संविधानाच्या मर्यादेच्या आतच राहिले पाहिजे. अशा प्रवृत्तींचे संघाने कधीही समर्थन केलेले नाही व याविरोधात आम्ही उभे आहोत.”

आर्थिक मंदीवर सतत चर्चा करून नका,

देशातील आर्थिक मंदीवर सतत चर्चा करून नका, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागरिकांना दिला आहे. केंद्र सरकारने देशातील मंदी दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असून आर्थिक मंदीतून देश लवकरच बाहेर पडेल असा विश्वास देखील भागवत यांनी व्यक्त केला आहे. भागवत पुढे असे म्हणाले की, मंदीवर सतत चर्चा झाल्याने व्यापारी, व्यावसायिक बचावात्मक पवित्रा घेतील. त्यामुळे ते फारशी गुंतवणूक करणार नाहीत. याचा परिणाम पुन्हा अर्थव्यवस्थेवर होईल असे भागवत म्हणाले.

जगातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक स्पर्धेचा फटका भारताला बसला आहे. देशाला मंदीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यासाची भूमिका घ्यावी लागणार आहे. सरकारने लोककल्याणकारी धोरणे व उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत प्रभावी पद्धतीने पोहचविण्याची गरज असल्याचे भगावत यावेळी म्हणाले. नागपुरातील रेशीमबाग येथे आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात भागवत बोलत होते. यावेळी भागवत यानी राजकीय, समाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य केले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार येता कामा नये

News Desk

नारायण राणेंचा डंका ! मंत्रीमंडळाच्या पहिल्या रांगेत,यादीतही पहिलचं नाव…

News Desk

BMC निवडणुकीत ‘या’ शिवसैनिकांना मिळणार उमेदवारी

Aprna