HW News Marathi
महाराष्ट्र

परिस्थिती काही करण्यास भाग पाडते

पुणे | परिस्थिती माणसाला काही करण्यास भाग पाडते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतेच पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेवरुन कळते. पुणे शहरातील वाकड परिसरात असलेल्या यमुना नगरमध्ये काही चोरांनी सोने, चांदी न चोरता चक्क भाजीपाला आणि कपडे चोरल्याची घटनासमोर आली आहे.

या परिसरात वारंवार भाजीपाला चोरींची घटना होत होत्या. त्यामुळे एका भाजी विक्रेत्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. सीसीटीव्हीमुळे हा सर्वप्रकार उघडकीस आला. या भुरट्या चोरांकडून भाजीपालाच नाही तर कपडेही लंपास केले जात आहेत. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून ही पोलीस चोरांना पकडण्यास अपयशी आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने तरी पोलिसांनी या चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिककडून होत आहे.

चोरीचे हे प्रकरण तुम्हा आम्हाला विचारात पाडणारे आहे. देशात एका बाजूला तरुण-तरुणी सुशिक्षित होण्याच्या प्रमाण वाढत आहे, दर दुसऱ्याबाजूला सुशिक्षित बेरोजगारचे प्रमाणातही तितकीच वाढ होताना दिसत आहे. नोकऱ्या न मिळाल्यामुळे तरुण-तरुणी हे गैरमार्गाचा वापर करुन आपल्या प्रथमिक गरजा पूर्ण करत आहे.

पण, भाजीपाला आणि कपडे यासारख्या गोष्टी चोरल्या जात असेल तर जे व्यक्ती हे चोरी करत असतील. या चोरी करण्यामागचे नेमके कारण का? असा सवाल येथे उपस्थित होत आहे. पोलिसांनी नव्हे तर तुम्ही आम्ही सर्वांनीच याचा शोध घेणे गरजेचे आहे. म्हणजे आज लोकांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या प्रथमिक गरजा देखील पूर्ण होत नाहीत का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला अटक होण्याची पहिलीच वेळ!

News Desk

फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही कारण महाराष्ट्राला त्यांची गरज! – संजय राऊत

News Desk

भीमा कोरेगाव प्रकरणी १२ जणांना अटक

News Desk