HW News Marathi
महाराष्ट्र

बीएमसीच्या प्रभागात वाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई। बृहन्मुंबई महानगरपालिका यांची सध्याची नगरसेवकांची संख्या २२७वरून २३६ ऐवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं काल (१० नोव्हेंबर) च्या झालेलं बैठकीत हा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळानं गेल्या ही महिन्यात अन्य महापाालिक आणि नगरपालिकमधील सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईची लोकसंख्येत झपाट्यानं वाढ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याची भूमिका मंत्रिमंडळानं घेतली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ टक्के इतकी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या काळात झालेली होती. त्याआधारे २०२१ पर्यंतची लोकसंख्या वाढ होणार असल्याचं गृहित धरून नगरसेवक संख्या वाढविण्यात आली आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गणित बदलले आहे. आता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. पण, काँग्रेसने पहिलेच मुंबईत स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच बीएमसीमध्ये शिवसेनेंची सत्ता २०२२ मध्ये संपणार आहे.
यावेळी २०१७च्या निवडणुकीत शिवसेना व भाजप हे त्यावेळचे मित्रपक्ष वेगवेगळे लढले होते. यावेळी भाजपच्या तुलनेत शिवसेना थोडी अधिक सदस्यसंख्या जास्त मिळवत शिवसेनाला हाती सत्ता राखण्यात यश आले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह ३ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

पैनगंगा नदीवरील बंधाऱ्यासह विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या १६ पुलांना मुख्यमंत्र्यांची मान्यता

Aprna

पोरक्या बहीण- भावाची एका तपानंतर घडली भेट

News Desk