HW News Marathi
महाराष्ट्र

कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा !

मुंबई | कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा होणार असून शेतकऱ्यांनी कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम व शांतता बाळगावी, असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे. भुजबळांनी कांदा प्रश्नावर आज (२ मार्च) विधानभवनमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले की, “केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. याबाबत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी निर्यात बंदी उठवण्याबाबत काम सुरु असल्याचे सांगितले. परंतु कांदा निर्यात बंदी अद्याप सुरु असल्याने व बाजारात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचा बाजारभाव घसरत आहे.

दरम्यान, कांदा निर्यातबाबत शरद पवार यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात-लवकर कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, अशी विनंती भुजबळांनी शेतकऱ्यांना केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करु नये, राष्ट्रवादीने झापलं

News Desk

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा राजभवनावर मोर्चा

News Desk

ST कर्मचाऱ्यांनी दगड-चप्पल फेक आंदोलन करणे, हे अतिशय दुर्दैव! -धनंजय मुंडे

Aprna