HW News Marathi
देश / विदेश

शिवसेना यूपीएमध्ये जाणार ‘या’ चर्चा केवळ माध्यमांमध्ये – राऊत

नवी दिल्ली | शिवसेना यूपीएमध्ये जाणार या चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. यूपीए संदर्भातील चर्चा या मीडियामध्ये आहेत आमच्या मध्ये नाहीत. आम्ही या सर्व गोष्टी वृत्तपत्रातून वाचतो आणि ऐकतो. असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (७ डिसेंबर) पत्रकार परिषदेतून दिले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना यूपीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राऊतांनी उत्तर देऊन या सर्व चर्चांना पूर्णविरोम लावला आहे. राऊत हे आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

शिवसेनात यूपीएचा भाग होणार नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल, राऊत म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही आता कशा करत विचारता. यासंदर्भात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील. आम्ही कोणाचा भाग बनायचा आणि कोणत्याही भागाशिवाय आम्ही तीन पक्ष महाराष्ट्रविकासआघाडी म्हणून राज्याच्या सत्तेमध्ये आहोत. आणि यूपीएमध्ये काय असते शेवटी भिन्न विचारचे पक्ष एकत्र येतात. सत्ता स्थापन करतात आणि समान कार्यक्रमावर आपली सरकार चालवितात. यूपीएसुद्धा त्याच पद्धतीने चालते. वाजपेयीच्या नेतृत्त्वाखाली देखील एनडीएमध्ये सुद्धा अनेक विचार धाराचे पक्ष होते. यात राम मंदिराला विरोध करणारे पक्ष देखील होतात. त्यानंतरच्या एनडीएमध्येसुद्धा तसेच पक्ष होते. महाराष्ट्र जो प्रयोग चालाय तो यूपीएचा प्रयोग चालाय”.

केंद्र आणि राज्य स्तरावर मनावर फार ओझे घेण्याची गरज नाही. तो शिवसेनेचा प्रश्न आहे. त्याबाबातीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ते निर्णय घेतली. आम्ही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत. उद्धव ठाकरे यांच्या कायम भूमिका आहे की, जो यूपीए आहे. किंवा विरोधी पक्षाची जी आघाडी आहे. त्यांनी अधिक मजबुतीने पुढे याईला पाहिजे. त्यात जास्ती जास्त राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजे आहे. आणि एक समर्थ पर्याय उपलब्ध केला पाहिजे. हे जसे शरद पवारांचे म्हणे आहे तसेच उद्धव ठाकरेंचे देखील म्हणे आहे. आणि ती भूमिका चुकीची आहे असे मला वाटत नाही.

राहुल गांधी यांनी मी आज नक्कीच भेटणार

राहुल गांधी भेटीसंदर्भात राऊतांना प्रश्नविचारल्यावर ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी मी आज नक्कीच भेटणार आहे, त्याला तुम्ही कर्टसी (शिष्टाचार) का म्हणत नाही. आम्ही ऐकमेंकांसोबत संवाद ठेवत असतो. शिवसेना हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षसोबत सत्तेमध्ये सहभागी झालेला पक्ष आहे. ऐकमेकांच्या मदतीने समान नागरी कार्यक्रमावर आम्ही सरकार चालवितो. सरकार उत्तम चालेले आहे. आणि तिन्ही पक्षामध्ये संवाद असावा, असे आम्हाला वाटते. त्यामुळे मी जेव्हा दिल्लीत असतो, तेव्हा मी त्यांना भेटतो.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CDS बिपीन रावत यांना वेलिंग्टन सैनिक रुग्णालयाबाहेर लष्करी अधिकाऱ्यांकडून मानवंदना

News Desk

ओडिशानंतर आता ‘या’ राज्यातही १ मेपर्यंत लॉकडाऊन

News Desk

सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील स्त्रियांना प्रवेश खुला । सर्वोच्च न्यायालय

News Desk