HW News Marathi
महाराष्ट्र

“माझा मनसुख हिरेन करण्याचा ठाकरे सरकारचा कट”, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई | माझा मनसुख हिरेन करण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांना काल (२३ एप्रिल) मातोश्रीवर हनुमान चालिसा पठाण प्रकरणी पोलिसांनी अटक केले होते. यानंतर सोमय्या राणा दाम्पत्यांना भेटीसाठी खार पोलीस आले होते. यावेळी शिवसैनिकांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी आज (२४ एप्रिल) मुलुंड येथील भाजपच्या पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेन

 सोमय्या म्हणाले, “माझा मनसुख हिरेन करण्याचा कट ठाकरे सरकारचा आहे. माझ्यावर आतापर्यंत तीन वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु, राज्याची जनता माझ्यासोबत असून राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही जीवंत आहे. आणि माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकतनाही. आम्ही उद्धव ठाकरे सरकारच्या नेत्यांना पाहू घेऊ. मला मारणार या हिंदुस्थानात जन्माला आलेलाच नाही.”

उद्धव ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला

 खार पोलीस स्टेशन येथे काल माझ्यावर जो हल्ला झाला. तो उद्धव ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता, असे सोमय्या म्हटले. पुढे सोमय्या म्हटले, “मी पोलीस स्टेशनला रात्री साडे नऊच्या सुमारास येणार असल्याचे कळावले होते.  मी पोलीस स्टेशनला येण्याआधीच ७० ते ८० शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशनच्या आवारात आणि दराजवळ जमले होते. माझी गाडी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर शिवीगाळ करण्यात आली. आणि माझी गाडी थांबवण्याचाही प्रयत्न केला असून मी परत जात असताना तरही माझ्यावर हल्ला झाला. मी जबाबदारी म्हणून पोलिसांना सांगितले. परंतु ते म्हटले की आम्ही सगळी व्यवस्था केली असून पोलीस स्थानकाचे दार उघडताच बाहेर असलेले ७० ते ८० गुंडांच्या हवाले माझी गाडी दिली. हे सर्व पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केले. यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहे.” असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील !

swarit

युजीसी फंडाची माहिती मागणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षातून हकलले 

News Desk

“भाजपा खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार!” – नाना पटोले

News Desk