HW News Marathi
महाराष्ट्र

ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच !

मुंबई | “राज्यभालांची घेणार सदिच्छा भेट आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच, असे सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (४ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतरही सरकार स्थापन झाले नाही. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष सुरू आहे. तर संजय राऊत दररोज भाजपवर तोफ डागत आहेत. राऊत आज (४ नोव्हेंबर) आज सायंकाळी ५ वाजता राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राऊत सत्ता स्थापनेचा दावा करणार नसून राज्यापालांची भेटी ही सदिच्छा भेट असल्याचे राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राऊत म्हणाले की, राज्यभालांची भेट ही सदिच्छा भेट आहे. कोश्यारी हे अनुभवी नेते आहे. ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहाचा प्रचंड अनुभव आहे. आम्हीही त्यांच्यासोबत काम केले आहे. निवडणूक झाली, निकाल आला, यादरम्यान त्यांची भेट होऊ शकली नाही. मी उद्धव ठाकरेंशी बोललो आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच,” असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यपालांच्या भेटीदरम्यान राऊत घटनेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण द्या, अशी मागणी ते राज्यपालांकडे करणार असून राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात करावी, या मागणीसाठी राज्यापालांशी राऊत भेटणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते राऊत यांनी गेले. तसेच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी दादरमधील शिवतीर्थावर होईल. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावातील नागरिकांचे केले स्थलांतर

News Desk

जिल्हा सहकारी बँकांमध्ये केंद्राचा हस्तक्षेप, अजित पवार म्हणाले याविरोधात न्यायालयात जाणार!

News Desk

महाविकासआघाडी सरकाराचा अधिवेशन आटोपण्याचा निर्धार!

Aprna