HW News Marathi
महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनच्या कालावधीवरून फडणवीस नाराज; म्हणाले… सरकारला रस नाही!

मुंबई | महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी चार ते पाच दिवस होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात पुन्हा बैठक होणार असल्याचे ही फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आजच्या (२९ नोव्हेंबर) बैठकीवर फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्या संसदीय कामकाजात या सरकारला रस नसल्याचा आरोप फडणवीसांनी केली आहे.

तसेच मार्च महिन्यातील अधिवेशन नागपूरात करू, असे आश्वासन सरकारने दिले आहे. कामकाज सल्लगार समतिची बैठक सुरू असून या बैठकीसाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील याबैठकीला उपस्थित होते. गेल्या दोन वर्षात अधिवेशनात कोणत्याच प्रश्नांवर चर्चा नाही.

अधिवेसनाचा पहिला दिवस हा शोक व्यक्त करण्यात जातो. म्हणजे हिवाळी अधिवेशन हे एवघे चार दिवसाचे आहे. आम्ही सरकारला अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विनंती केली. तीन दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन सुरू करू शकता. पुन्हा जानेवारी महिन्यात पाच ते सहा दिवस अधिवेशन होऊ शकते, असा पर्याय फडवीसांनी सूचविला. मात्र अधिवेशन घेण्याची मानसिकता या सरकाराची दिसत नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती!– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

“वर्षभर ३ पक्ष एकत्र विटी दांडू खेळत होते का”, भाजपचा परखड सवाल

News Desk

#MaharashtraResult2019 : पवारांच्या ‘त्या’ भाषणामुळे उदयनराजेंचा पराभव

News Desk