HW News Marathi
महाराष्ट्र

…तर अजित पवार म्हणाले, आणि रोहित पवारांनी देखील केंद्राकडून केली मदतीची अपेक्षा!

मुंबई। राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हैदोस माजवला आहे. पीकं पाण्यात गेलीय, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. अशा परिस्थितीत राज्य सरकार मदतीचं काम तर करेलच पण केंद्र सरकारने विशेष लक्ष देऊन राज्याला निधी द्यावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून राज्याला मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करुन राज्यातील नुकसानीची माहिती केंद्र सरकारला देण्याचा प्रयत्न केलाय तसंच आपल्या काकांप्रमाणेच केंद्राकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यावर संकटांची मालिका असूनही ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली. केंद्र सरकारने किमान आता तरी बघ्याची भूमिका न घेता राज्याला निधी द्यावी, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवार काय म्हणाले?

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “जर 50 हजार रुपये केंद्रानं राज्य आपत्ती निधीतून द्यायला सांगितले असेल तर ते देता येईल, कारण केंद्राकडूनच हा निधी दिला जातो. केंद्र सरकारनं दुजाभाव करु नये. कारण आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे”, असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी केली जातेय. पण महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. प्रत्येक पालकमंत्री त्या त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अडचणीतील माणसाला मदत करायचं‌ काम सुरु आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 50 हजार तातडीने द्या : राज ठाकरे

कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. आता ‘गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्ञानासाठी विद्यार्थ्यांना तुडवावा लागतोय गुडघाभर चिखल, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Manasi Devkar

शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीवरून बीडमध्ये राडा!

News Desk

नांदगाव मतदारसंघात रखडलेल्या प्रकल्पांना न्याय देऊ! – मंत्री छगन भुजबळ

News Desk