HW News Marathi
देश / विदेश

..तरच मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु होणार, आयुक्तांची माहिती

मुंबई | “मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबली, तरच पुन्हा मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार”, असे स्पष्ट विधान महानगपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी केले आहे.मुंबईतील कोरोनास्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील ‘अनलॉक’नंतर सर्वसामान्यांना प्रवासासाठी मोठी गैरसोय झाली आहे. म्हणूनच “आम्हालाही लोकल प्रवासाची परवानगी द्या”, अशी मागणी सातत्याने सर्वसामान्य प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, इक्बाल चहल यांनी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या एक टक्क्यावर आली, तरच मुंबई अनलॉक होईल”, असेही इक्बाल चहल यांनी स्पष्ट केले आहे. “सद्यस्थितीत मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, एमएमआर क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यास्थितीत या क्षेत्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणणे, ती थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा रुग्णसंख्या वाढत. जोपर्यंत कोरोना रुगसंख्या १ टक्क्यावर पोहोचत नाही. तोपर्यंत मुंबई अनलॉक होणार नाही”, असेही चहल यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई लोकलबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील असेही यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात याबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन !

News Desk

इस्त्रोची मोहीम फेल, क्रायोजेनिक इंजनमध्ये बिघाड झाल्याने मिशन रद्द!

News Desk

अबब… चार वर्षात मोदींचे ऐवढे परदेश दौरे

swarit