HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर उद्धव ठाकरेही बेईमान झाले नसते”, शिवसेना नेत्याचं फडणवीसांना प्रत्युत्तर

जळगाव | “भाजपने बेईमानी केली नसती तर ही वेळ आली नसती. भाजपवाले बेईमान झाले नसते तर आज उद्धव ठाकरे बेईमान झाले नसते”, असं विधान शिवसेना नेते आणि पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. महाविकासआघाडीच्या सरकार स्थापनेबाबत जळगावमध्ये बोलताना गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “जळगावमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते. तेव्हा मी स्वत: भाजपकडे तक्रार केली होती. भाजपने बेईमानी केली होती”, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

“उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती. ती त्यांनी मान्य करावी आणि मुखवटा उतरवावा”, या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी सुनावलं आहे. “भाजपने बेईमानी केली नसती तर ही वेळच आली नसती. पहिलं बेईमान कोण झालं हे भाजपनं आधी तपासावं आणि मग बोलावं. ते बेईमान झाले नसते तर आज ते जसं म्हणत आहेत त्याप्रमाणे उद्धव ठाकरे देखील बेईमान झाले नसते”, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री व्हायचं होतं. राजकारणात महत्वाकांक्षा असणं काही चुकीचं नाही. पण, त्यासाठी मुखवटा चढवणं चुकीचं आहे. तो मुखवटा आता उद्धव ठाकरे यांनी उतरवावा आणि मान्य करावं की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

…तेव्हा मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला! – शरद पवार

“मी ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचं, यासंबंधी दोन-तीन नावं आमच्याकडे आलेली होती. उद्धव ठाकरे ही बाब मान्य करायला तयार नव्हते. ते माझ्या शेजारी बसले होते. शेवटी विचारलं काय करायचं? कुणाला करायचं? उद्धव ठाकरेंचा हात मी हातात धरला आणि तो हात मी वर केला आणि सांगितलं हेच होतील. त्यांची त्या ठिकाणी हात वर करायची तयारी नव्हती, त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती. त्यांना अक्षरशा सक्तीने मी हात वर करायला लावला”, असं शरद पवार शनिवारी (१६ ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

तो माझा आग्रह होता!

बाळासाहेबांचे आणि माझे राजकीय मतभेद होते पण व्यक्तिगत सलोखाही अत्यंत जवळचा होता. ते दिलदार गृहस्थ होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी योगदान दिलं आहे. महाविकासआघाडीचं सरकार बनवण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा तीन पक्षांमध्ये सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा नेता करण्याचं ठरल्यानंतर आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला आपण भाग पाडावं असा माझा विचार होता. म्हणूनच, मी सक्तीने त्यांचा हात वर केला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं”, असंही यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करायाचे !

swarit

यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू नाही | नागपूर खंडपीठ

News Desk

काँग्रेस-राष्ट्र्वादीकडून मनधरणीचा प्रयत्न, हर्षवर्धन पाटील मात्र ‘नॉट रिचेबल’

News Desk