HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर आम्ही त्यांना एसटीच्या सीटवर बांधून ठेऊ”- नितेश राणे

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा हा चांगलाच गाजतो आहे. आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाणे डेपोमध्ये जाऊन एसटीची पाहणी केली. एसटी कामगार तासंतास अशा स्थितीत गाडी चालवतो. या लोकांनी एसटीची काय अवस्था केलीय, असा सवाल आता भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. आणि याचवेळी सत्ताधारी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. माझं आव्हान अनिल परब यांना आहे की, त्यांनी या सीटवर एक तास बसावं, मग कळेल की एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा काय असतात, असं घडत नितेश राणे यांनी टीकेची झोड परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर उठवली आहे.

आघाडी सरकारचा तेरावा या सीटवर घालणार

नितेश राणे एवढ्यावरच न थांबता पुढे असे देखील म्हणाले, अनिल परब यांनी या सीटवर एक तास तरी बसून दाखवावं. विलीनीकरण केलं नाही तर आम्ही त्यांना या सीटवर बांधून ठेऊ, असं नितेश राणे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारचा तेरावा या सीटवर घालणार आहोत, असं खळबळजनक विधान आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाणे डेपो मध्ये जाऊन केले आहे. या बरोबरच नितेश राणे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधत दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील टार्गेट केल आहे. अजित पवार यांना विनंती आहे की त्यांनी चार पावलं पुढं येऊन या सीटवर बसून गाडी चालवून दाखवावी. आणि मग एसटी कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवावे की नाही, हे त्यांना कळेल, अशी टीकाच आता अजित पवारांवर राणेंनी केली आहे.

अनिल परब काय म्हणाले?

गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. एसटीच्या संपामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं, असं अनिल परब म्हणाले. अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर वेगवेगळे काय मार्ग निघू शकतात. या मार्गाच्या बाबतीत त्यांनी तपासणी केली, आणि एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रूळावर येईल त्यासाठी करायच्या उपाय योजना आणि आता संपकरी कामगारांच्या मागण्या यावर त्यांनी आज आमच्याशी सविस्तर चर्चा केली. असं अनिल परब म्हणाले आणि शरद पवारांसोबत काय चर्चा झाली तेदेखील अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. काही चर्चा सार्वजनिक करण्यासारख्या नाहीत, ठाम भूमिका कोणीही घेऊन चालणार नाही, दोन्ही बाजूचे समाधान कसं होईल असा मध्यम मार्ग काढायला हवा आणि तशी चर्चा या बैठकीत झाली. हा संप लवकरात लवकर संपावा, यात कर्मचारी आणि प्रवासी दोघांचंही नुकसान होत आहे असेही अनिल परब यांनी म्हटले आहे.


 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Aprna

ब्रेकिंग: छगन भुजबळ यांच्या लढ्याला मोठे यश

Sanjay Jog

कर्तव्यपथावर ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

Aprna