HW News Marathi
महाराष्ट्र

‘तो आवाज माझा नाहीच!’ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रामदास कदमांचं स्पष्टीकरण

मुंबई। शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांना मदत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर कदम यांनी ‘तो आवाज माझा नाहीच, याआधीही अशा ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या आहे’ तसंच, ‘शिवसेना मुख्यमंत्री झाला आहे. आमच्याच मुख्यमंत्र्यांला खाली उतरवण्याचे पाप मी कधीच करणार नाही’ असं स्पष्टीकरण कदम यांनी दिलं.रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. त्यानंतर रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना संजय कदम आणि वैभव खेडकर यांच्यावर जोरदार टीका केली.

माझ्या भगव्या झेंड्याशी बेईमानी केली आणि गद्दारी केली आता त्यांना काळजी वाटत आहे

अशी ही क्लिप पहिल्यांदाच आलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा माझ्या आवाजात अशा क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या. याबद्दल मी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. संजय कदम आणि वैभव खेडेकर हे दोघेही शिवसेनेत होते. दोघांनी माझ्या हाताखाली काम केलं. दोघांनी शिवसेनेशी बेईमानी करून निघून गेले. माझ्या भगव्या झेंड्याशी बेईमानी केली आणि गद्दारी केली आता त्यांना काळजी वाटत आहे’ अशी टीका कदम यांनी केली.प्रसाद कर्वे हा माझा पीए नाही. तो एक हा सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याच्या सर्व पक्षांसोबत संबंध आहे. माझं त्यांचं असं काही बोलणं झालं नाही’ असंही कदम म्हणाले.

सोमय्यांची पत्रकार परिषद झाली तर त्यांना माझ्याकडे घेऊन ये

‘त्या ऑडिओ क्लिपमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की सोमय्यांची पत्रकार परिषद झाली तर त्यांना माझ्याकडे घेऊन ये, असं मी त्याच म्हटलं असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण, जो माणूस शिवसेनेच्या मुळावर उठला आहे, त्याला मी कशाला बोलवणार? असा सवालही कदम यांनी केला.वैभव खेडेकर याची नगरपरिषदेतील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली होती. त्यांना अपात्र करण्यासाठी मी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आज हे आरोप केले आहे’ असा दावाही कदम यांनी केला.

दोघांविरोधात मानहानीचा दावा कोर्टात दाखल केला आहे

त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही, विधानसभा निवडणुकीच्या वेळी माझ्या आवाज ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या. खेडमध्ये माझ्यावर आरोप केले की राजकीय पोळी भाजून निघते. असं कटकारस्थान दोघांनी केलं आहे. याआधीही दोघांनी पत्रकार परिषदा घेऊन आरोप केले आहे, त्या दोघांविरोधात मानहानीचा दावा कोर्टात दाखल केला आहे, आताही कोर्टात जाणार आहे’ असा इशाराही कदम यांनी दिला.प्रवीण दरेकर हे कधीच माझ्याकडे आले नाही, असं कधीच घडलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या मनात माझ्याबद्दल कशा प्रकारे प्रतिमा तयार होईल, याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल परब आणि माझ्यामध्ये चांगले संबंध आहे, कोणतीही कटुता नाही’ असंही कदम म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचा अर्थसंकल्प: कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारण्याची गरज,आरोग्यसेवेसाठी ७ हजार कोटींचा प्रकल्प

News Desk

राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला, विनोद पाटलांचा आरोप

News Desk

निवडणुका होतील त्यावेळी देशातील चित्र बदललेले दिसेल !

News Desk