HW News Marathi
महाराष्ट्र

रावणाचा जीव जसा बेंबीत, तसा काहीचा जीव मुंबईत; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई | “रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. अर्थसंल्पीय अधिवेशनाचा आज (२५ मार्च) शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भाजपवर घाणाघाती हल्ला केला. आगामी काळात मुंबई पालिकेच्या निवडणुका होणार आहे. गेल्या तीन दशकापासून महानगर पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, “रावणाचा जीव हा त्याच्या बेंबीत होता. मात्र, काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. माझा जन्म मुंबईत झाला. मला मुंबईचा अभिमान आहे. जे जगात सर्वोत्तम आहे. ते आम्ही मुंबईत करणार आहोत. यापूर्वी महापालिकेच्या शाळांना झिडकारले जायचे. परंतु, आज महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्यांच्या प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते. आणि आता महापालिका आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव शिक्षण संस्था आहे.

सभागृहात मुख्यमंत्री म्हणाले, ” राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, त्यांचे महत्व माझ्यापेक्षा जास्त विरोधकांना माहिती आहे. विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे जातात. राज्यपाल महोदय नेमके काय बोलतात हे किमान ऐकून घेतले पाहिजे. राज्यपालांचे भाषण ऐकले नाही, तर मग समाजसुधारकांचे अनुकरण काम कसे करणार?, असा सवाल त्यांनी उपस्थिती केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर येत्या जूनपर्यंत केवळ ५ रुपयांत शिवभोजन

News Desk

१२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं हे राज्यपालांना कितपत मान्य आहे – जयंत पाटील

News Desk

“चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर हे मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेलं नाही”- देवेंद्र फडणवीस

News Desk