HW News Marathi
महाराष्ट्र

‘या’मुळे उद्धव ठाकरे धर्मवीर सिनेमाचा शेवटचा प्रसंग न पाहाता सिनेमागृहातून निघून गेले

मुंबई | शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत असलेला धर्मवीर दिघे हा सिनेमा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी काल (१५ मे) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी सिनेमा पाहाण्यासाठी गेले होते. यावेळी उद्धव ठाकरेंचे सिनेमागृहात जंगी स्वागत करण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री हे सिनेमागृहातून दिघेंच्या अपघाताचा प्रसंग पुढे येण्याआधीच उद्धव ठाकरे येथून निघाले. दिघेंच्या अपघातानंतर त्यांना सिंघानिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. दिघेंवर उपाचर सुरू असताना उद्धव ठाकरे हे त्यांना पाहण्यासाठी गेले नव्हते. या सिनेमामधील हा प्रसंग प्रक्षकांसाठी मोठा धक्का देणार ठरत असून मुख्यमंत्र्यांनी सिनेमातील हा प्रसंग न पाहाता हा सिनेमा अर्धवट सोडून निघाले. 

दिघेंनी २००१ मध्ये सिंघानिया रुग्णालयात अखेराच श्वास घेतला आहे. या सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघेची भूमिका साकारली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रसाद ओकने उत्तमरित्या दिघेंची भूमिका साकारली असून मला कुठेच जाणवले नाही की हा सिनेमा आहे. सर्वांनी हा सिनेमा पाहावा, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आयुष्य कसे जगावे हे आपण या सिनेमातून शिकलो पाहिजे. कारण, प्रत्येक शहरात एक आनंद दिघे पाहिजेच आहे. शिवसैनिक कसा असावा, हे या सिनेमातून कळते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिघेंचे नाते हे अत्यंत घट्ट होते. बाळासाहेबांचा दिघेंवर विश्वास होता. दिघेंचा अपघात झाल्यानंतर बाळासाहेंबांचे व्यस्थित झाल्याचे मी बाहिले आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले नाही. दिघेंच्या आयुष्याती वाईट प्रसंग रुग्णालयात उपचार घेत असताना उद्धव ठाकरेंनी भेट न घेतल्याचा मुद्दा आज पुन्हावर काढला जात होता. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनतेने उन्माद पसंत पडलेला नाही, सत्ता येते, जाते… पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात !

News Desk

शिवसेनेने विश्वासार्हतेचे फाटलेले ठिगळ सावरण्यासाठी शाहू महाराजांची घेतली भेट! – प्रविण दरेकर

Aprna

महाराष्ट्र सरकारची चांगलीच ‘हजामत’ करून, कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर केला – अतुल भातखळकर 

News Desk