HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील तिघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, फडणवीसांची टीका

नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज (२१ डिसेंबर) राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात दिली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र त्यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडणाऱ्या भाजपने सभात्याग केला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. “७/१२ कोरा करण्याचा शब्द सरकारकडून पाळण्यात आला नाही”, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. त्याचप्रमाणे “राज्यातील तिघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे”, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर सभात्याग करणाऱ्या भाजपची त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी या शेतकरी मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीनंतर देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद :

  • ज्याप्रकारे हे सरकार जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेवर आले, त्याचप्रमाणे त्यांनी ही विश्वासघाताची मालिका पुढे नेली आहे.

    दिलेली आश्वासन न पाळता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात या तिघाडी सरकारने केला.

  • शेतकऱ्यांना आता तातडीने मदत देण्याची आवश्यकता होती.
  • अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ९४ लाख हेक्टर जमिनीवरील सर्व पिकांचे नुकसान झाले.
  • शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार रुपये कोरडवाहूला आणि हेक्टरी ५० हजार रुपये बागायतीला, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.
  • मुख्यमंत्र्यांनी जरी ही घोषणा केली तरीही एक नवा पैसे देखील या अधिवेशनात या सरकारने दिलेला नाही.
  • राष्ट्रपती शासन असताना माननीय राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा करून जे पैसे दिले तेवढेच पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • या तिघाडी सरकारने या अधिवेशनात एक नवा पैसाही शेतकऱ्यांना दिला नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे ?

News Desk

नवी मुंबईत आधार कार्डसाठी मध्यरात्रीपासून रांगा

swarit

आरोप करणं हे विरोधी पक्षनेत्याचं काम आहे, त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते – विजय वडेट्टीवार

News Desk