HW News Marathi
महाराष्ट्र

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले, २२-२४ जण बेपत्ता, ६ जणांचा मृत्यू

रत्नागिरी । चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून अनेक घरे पाण्याखाली गेली असून तब्बल २२ ते २४ जण वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर ६ जणांचा मृतदेह सापडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सततच्या पावसामुळे मंगळवारी (२ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास सुरुवातीला तिवरे धरण भरुन वाहू लागले.

पावसाच्या सततधारेमुळे धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि खळबळ माजली. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले असून किमान २२ ते २४ जण वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. शिवाय पाण्याच्या जोरदार प्रवाहात १२ घरंही वाहून गेली आहेत.
या घटनेची माहिती मिळाताच रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच पुणे आणि सिंधुदुर्गातून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१२ आमदारांचं निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या, मग वर्षभरापासून राज्यपालांनी दाबलेली यादी लोकशाहीची हत्या नाही का?”

News Desk

ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांच्या वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती; अस्लम शेख यांची माहिती

Aprna

आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा; एकनाथ शिंदेंनी पावसाळापूर्व कामांचा घेतला आढावा

Aprna