HW News Marathi
महाराष्ट्र

“अजित दादांच्या मनात काय चाललं ते कळलं पाहिजे म्हणून मी ‘ती’ भाषा शिकणार” – मुख्यमंत्री

शिवनेरी | शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१९ फेब्रुवारी) शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केले आहे. “शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यातली एक भाषा अजितदादांनाही येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे कळलं पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच एकच खसखस पिकली. शिवजयंती निमित्त शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आदी उपस्थित होते. महाराजांना अभिवादन केल्यानंतर शिवनेरीवर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मिश्किल भाष्य केलं. शिवाजी महाराजांना अनेक भाषा यायच्या. त्यातली एक भाषा मला माझ्या सहकाऱ्यानं सांगितली. अजितदादांना ती भाषा येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात काय चाललं ते कळलं पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे, असं मिश्किल भाष्य मुख्यमंत्र्यांनी करताच एकच खसखस पिकली होती.

आपल्या धमण्यात शिवाजी

शिवरायांपुढे नतमस्तक व्हायला शिवजंयतीच पाहिजे असं नाही. कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरे वर्ष आहे शिवनेरीवर येण्याचे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, हृदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

युद्ध जिंकण्यासाठी एक जिगर लागते

छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका. छत्रपती दैवत का आहे. तर युद्ध जिंकण्यासाठी एक जिगर लागते, युद्धावर जाताना तलवार हातात पकडण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी दिलीय. पण आता कोरोनासारखा दुश्मन आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे, असं सांगतानाच साप तसे अजूनही आहे. काही साप चावतात. तर काही चावत नाहीत. त्यांना ठेचायचं असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी CBI करणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश

News Desk

मराठा आरक्षणामागे राजकीय षडयंत्र, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

News Desk

संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू – संभाजीराजे 

News Desk