HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) शेवटचा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाचे आजचे (23 मार्च) कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकाच वेळी विधिमंडळाच्या परिसरात प्रवेश केला. ठाकरे-फडणवीस एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. तेव्हा फडणवीस-ठाकरेंनी विधिमंडळात प्रवेश केला. यावेळी फडणवीस-ठाकरें एकमेकांकडे पाहत, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्त आणि संवाद करत विधानभवनात आले.

फडणवीस-ठाकरे विधानसभेत एकत्र आल्यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना यासंदर्भात प्रश्न विचारले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “पूर्वी खुलेपणा होता. ता बंद दाराआड चर्चा ही अधिक फलदायी होते असे म्हणतात. जेव्हा आमची कदाचित किंवा कधी तरी झालीच बंद दाराआड चर्चा तर तेव्हा बोलू.” यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना प्रश्नांची सरबत्ती लावली, यावर ते म्हणाले, “मी आणि ते दोघेही प्रवेशदारातून प्रवेश करताना एकमेकांशी रामराम, हाय, हॅलो म्हणतो. तसेच झाले. यानंतर तुमच्यातील राजकीय दुरावा कमी होईल का? पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “अशा गोष्टी मोठ्या काही करू नका. कोणाला हाय, हॅलो म्हणणे पण, पाप झाले का?,  काही हेतू पुरस्कृत हे करावे का?”, असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी पत्रकारांच केला.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 25 मार्च रोजी संपणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०१९मध्ये मोदींनाच पंतप्रधान म्हणून पसंती

News Desk

अँस्ट्राँसिटी जनजागरण परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 

News Desk

निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही! – रोहित आर आर पाटील

Aprna