HW News Marathi
Covid-19

भारतातील कोरोना बाधितांची संख्या ५२ हजार ९५२ वर, तर १५ हजार २६६ जण बरे होऊन घरी परतले

नवी दिल्ली | देशातील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या ५२ हजार ९५२ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ हजार ७८३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज (७ मे) दिली आहे. आतापर्यंत देशात १५ हजार २६६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ३५ हजार ९०५ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयात डॉक्टार, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यापैकी ५४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोररोनाची बाधा झाली असून ही सर्व आकडेवारी केंद्र सरकारकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, या आकडेवारीत कर्मचारी, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि शिपाई यांचा समावेशन नाही.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. काल (६ मे) १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल – हसन मुश्रीफ

News Desk

दिलासादायक ! महाराष्ट्रातील पहिले दोन पाॅझिटिव्ह रूग्ण झाले निगेटिव्ह

Arati More

राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या

News Desk