HW News Marathi
महाराष्ट्र

अस्वलाच्या हल्ल्यात २ व्यक्ती ठार, आपल्या पिलांच्या मृत्यूचा घेतला बदला

बुलढाणा | मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग वनपरीक्षेत्र सोनाळामधील खडकपाणी या ठिकाणी निमखेडी येथील २ व्यक्तींवर अस्वलाने हल्ला केला. या हल्य्याने दोघांचाही जागीच मुत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अशोक मोतीराम गवते (वय ५२), माणा बंडु गवते (वय ४२) अशी या मृतांची नावे असून हे दोघेही निमखेडी तालुका संग्रामपुर येथील रहिवासी होते. हे दोघेही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे गाभा क्षेत्रातील खडकपाणी गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला.

संबंधित व्यक्तींच्या मृतदेहापासून साधारणतः १५ ते २० मीटर अंतरावरती सुमारे 6 ते 8 महिन्यांची २ अस्वलांची पिल्ले देखील मरण पावल्याचे दिसून आले. त्यांच्या अंगावरती कुऱ्हाडीने मारल्याच्या जखमा देखील आढळून आल्याची माहिती मिळते. आपल्या या पिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी या अस्वलाने त्या २ व्यक्तींवर हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अकोट हे दाखल झाले. दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात वरवट बकाल येथील शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घाबरलो नाहीत आणि घाबरणारही नाही, राहुल गांधींचं आवाहन

News Desk

‘मुंबईतील नोकरदार वर्ग ऑफिसला कसा जाणार?’, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

News Desk

खडसे चौकशीला सहकार्य करत असतील तर अटकेची गरज काय? उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल

News Desk